ताज्या बातम्या

ट्रान्सपरन्ट अनारकलीची स्टाइल!

Written By Aurangabadlive on शनिवार, २५ मे, २०१३ | १०:४९ AM

भरजरी अनारकलीची स्टाइल अजूनही इन आहेच. पण सध्या चलती आहे, ट्रान्सपरन्ट अनारकलीची. या ट्रान्सपरन्ट घेरामुळे चुडीदारवरचं वर्कही दिसून येतं आणि छान लुकही मिळतो.
फॅशनच्या बाबतीत बोलू तेवढं कमीच आहे. दररोज बाजारात एक नवी फॅशन दिसते. त्यातही कपड्यांच्या तèहा तर पाहायलाच नकोत. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांपैकी नव्वद जणींचा अनारकली सूट असतोच असतो. कॉटन कॉटन अनारकली, वर्कड अनारकली, शरारा अनारकली, पेट्लेट्स अनारकली, डबल घेर अनारकली असे विविध प्रकार यामध्ये पाहायला मिळतात. त्यातच आता भर पडलीय, टड्ढान्सपरंट अनारकलीची. सध्या हे डड्ढेसेस टीव्ही, सिनेमाच्या तारकांवर झळकताना दिसले तरी लवकरच ते बाजारात दिसतील. या डड्ढेसचा वरचा अर्धा भाग कॉटन, शिफॉन, वेलवेट अशा मटेरिअलचा असून त्यावर पूर्णतः वर्क केलेलं असतं. तर डड्ढेसचा खालचा घेर संपूर्ण टड्ढान्सपरंट असतो. या स्टाइलची खासियत म्हणजे त्याची सलवार प्लेन नसून, चुडीदार स्टाइलची मस्त भरीव वर्क केलेली असते. पायावरची ही डिझायनर चुडी उठून दिसावी म्हणूनच अनारकलीची घेर ट्रान्सपरन्ट ठेवला जातो. या पॅटर्नमध्ये क्रेप, सिल्क, वेलवेट, क्रश अशा मटेरिअल्सला जास्त मागणी आहे. ही फॅशन नवखी असली तरी अनेक मैत्रिणी त्याला पसंती देताना दिसताहेत. अनारकली डड्ढेसइतकाच महत्त्वाचा असतो त्याचा चुडीदार. पण अनारकलीवर खूपच वर्क असल्याने पायावरची चुडी झाकली जाते. मग ती डिझायनर चुडी दिसण्यासाठी अनारकलीच्या टॉपमध्ये असा बदल करण्यात आला आहे.

मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस


औरंगाबाद : पावसाच्या प्रमुख नऊ नक्षत्रांपैकी सात नक्षत्रात पंचांगकर्ते यांनी समाधानकारक पाऊस दर्शविला आहे. विशेष म्हणजे दोन्ही सुगीचा निवाडा करणाèया स्वाती नक्षत्रातही यावर्षी पाऊस सांगण्यात आला आहे. परिणामी समाधानकारक वृष्टी होऊन धनधान्यांची भरभराट व्यक्त करण्यात आली आहे. मृग नक्षत्र हे सहसा ७ जून रोजी सुरू होते. परंतु, यावर्षी मृग प्रवेश ८ जून रोजी पहाटे ५. ३६ वाजता होत आहे. वाहन हत्ती असल्यामुळे हे नक्षत्र भरपूर बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आ
ली आहे. मागील चार वर्षात मृगाचा पाऊस उशिरा झाल्याने शेतकèयांना मृगपेर साधलेली नव्हती. यावर्षी २० जूनपर्यंत सर्वदूर वृष्टी अपेक्षित आहे.
पंचांगकत्र्यांच्या मते मागील पाच वर्षातील पाऊसकाळ पाहता खंडित वृष्टीचे प्रमाण अधिक राहिले आहे. यावर्षी पाऊस सर्वत्र दर्शविला असल्याने जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राच्या शेवटच्या चरणात वादळी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पुष्य, अ‍ेषा, मघा, पूर्वा व स्वाती हे नक्षत्र निश्चितपणे व भरपूर बरसणार आहेत. वर्षाकाळातील ११ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्र पावसाची असतात. सहसा पाच नक्षत्र जरी बरसले तरी अबादीअबाद मानली जाते. यावर्षी ७ नक्षत्रांची देणं अपेक्षित आहे. मराठवाडा विभागात विशेष करून दाते व देशींकरांचे पंचांग ग्राह्य मानले जाते. त्यांनी व्यक्त केलेला हा अंदाज आहे.


सबको शूट करो...



एससीपी नरेश मेघराजानी यांचा अजब उपाय

औरंगाबाद : भास्कर जावळे या तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे, हवालदार विकास गायकवाड व इतर अधिकारी
यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी या तरुणाचा मृतदेह क्रांतीचौक ठाण्यात जवळपास तासभर ठेवण्यात आला. सुरुवातीला एसीपी नरेश मेघराजांनी यांनी दांडगाई करत सबको शूट कर दो, असा आदेश दिला. पण गोळीबाराच्या धमकीलाही जनता न घाबरल्यामुळे पोलिसांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. नातेवाईकाच्या अर्जानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून घरी नेण्यात आला. एसीपी आणि जमावाच्या बाचाबाचीमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. तेव्हा उपस्थित हजारो नागरिक, मयताचे नातेवाईक व कार्यकर्ते संतप्त झाले. मयताची बहीण सुनयना जावळे हीदेखील संतप्त झाली. तुम्ही आम्हाला गोळ्या घालणार आहात काय? दबावाचे राजकारण आम्ही सहन करणार नाही. जे होईल ते होईल, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली होती.

मुख्यमंत्री औरंगाबादेत, चर्चा, बैठका सुरू


औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल रात्री नऊच्या सुमारास विमानाने औरंगाबादेत आले.चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत झाले. सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांच्याकडे गèहाणे मांडण्यासाठी अनेक शिष्टमंडळे प्रतीक्षा करीत होती. येथे त्यांनी त्यांची निवेदने स्वीकारली.  यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हेही उपस्थित होते. पाच कोटी आणि साडेआठ कोटी रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जायकवाडीतून कालवे काढण्यात आले आणि त्याद्वारेच औरंगाबाद शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. याबद्दल त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी धन्यवाद दिले. आज मुख्यमंत्री जायकवाडीला जाऊन काम पाहणी  करत आहेत. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या सिल्लोड तालुक्यातील खेळणा प्रकल्पातील कामेही ते पाहणार आहेत.

सर्वपक्षीय आमदारांची १६ जूनला बैठक


औरंगाबाद : मराठवाडा विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने येत्या १६ जून रोजी औरंगाबादेत सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे आणि सरचिटणीस डॉ. सोमनाथ रोडे यांनी सांगितले की, मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर जनता विकास परिषद मागील काही दिवसांपासून न्यायालयीन लढा देत आहे. या लढ्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडीत पहिल्या टप्प्यात अडीच टीएमसी आणि दुसèया टप्प्यात नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले; परंतु हा प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडण्याची गरज आहे. 

पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा उद्या


औरंगाबाद : अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एम. फार्म., बी.फार्म.चे निकाल जाहीर व्हायचे आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत २६ मे रोजी एम. ई., एम. टेक. आणि एम. आर्च.साठी प्रवेशपूर्व परीक्षा होत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशाची पहिली फेरी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला दिले. त्यानुसार सीईटी घेण्यात येत आहे.
सीईटीचा निकाल लागून प्रवेश फेèया सुरू होण्यापूर्वी अंतिम वर्षाचे निकाल जाहीर न झाल्यास प्रवेशाचा गोंधळ उडणार आहे. ज्यांना पदव्युत्तरला प्रवेश घ्यावयाचा आहे, परंतु पदवीचा निकालच लागलेला नाही त्या विद्याथ्र्यांसमोर अडचणी उभ्या राहतील. गेल्या वर्षीपर्यंत सर्व विद्यापीठांचे पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल लागल्यानंतरच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत होती. न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवायचा असेल तर विद्यापीठांना परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.

पोहण्याची मजा काही औरच...

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | १०:३५ AM


उन्हाने जिवाची होणारी काहिली अन् त्यामुळे वाढणारा तगमग दूर करण्यासाठी तरुण मंडळी पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.