औरंगाबाद : अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एम. फार्म., बी.फार्म.चे निकाल जाहीर व्हायचे आहेत. अभियांत्रिकीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत २६ मे रोजी एम. ई., एम. टेक. आणि एम. आर्च.साठी प्रवेशपूर्व परीक्षा होत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशाची पहिली फेरी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला दिले. त्यानुसार सीईटी घेण्यात येत आहे.
सीईटीचा निकाल लागून प्रवेश फेèया सुरू होण्यापूर्वी अंतिम वर्षाचे निकाल जाहीर न झाल्यास प्रवेशाचा गोंधळ उडणार आहे. ज्यांना पदव्युत्तरला प्रवेश घ्यावयाचा आहे, परंतु पदवीचा निकालच लागलेला नाही त्या विद्याथ्र्यांसमोर अडचणी उभ्या राहतील. गेल्या वर्षीपर्यंत सर्व विद्यापीठांचे पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल लागल्यानंतरच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत होती. न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवायचा असेल तर विद्यापीठांना परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.