औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल रात्री नऊच्या सुमारास विमानाने औरंगाबादेत आले.चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत झाले. सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांच्याकडे गèहाणे मांडण्यासाठी अनेक शिष्टमंडळे प्रतीक्षा करीत होती. येथे त्यांनी त्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हेही उपस्थित होते. पाच कोटी आणि साडेआठ कोटी रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जायकवाडीतून कालवे काढण्यात आले आणि त्याद्वारेच औरंगाबाद शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. याबद्दल त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी धन्यवाद दिले. आज मुख्यमंत्री जायकवाडीला जाऊन काम पाहणी करत आहेत. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या सिल्लोड तालुक्यातील खेळणा प्रकल्पातील कामेही ते पाहणार आहेत.