प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह औरंगाबादमधील जवळपास सर्वच नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सामान्य कायकर्ते आणि शहरवासिय बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून असून, त्यासाठी टीव्हीसमोर बसून आहेत. काही शिवसैनिकांनी मंदिरात अभिषेक आणि पूजा करून, बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली व बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खैरे यांच्यासोबत शहर आणि मराठवाड्यातील शिवसेना नेते, प्रमुख कार्यकर्ते सध्या मातोश्रीवरच आहेत. शहरात रात्रीपासूनच बाळासाहेबांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली. त्यामुळे औरंगाबादच्या दिवाळीवर विरजण पडले आहे. लोकांनी फटाके फोडणेही बंद केले असून, शहरवासिय टीव्हीवरील बातम्यांतून बाळासाहेबांच्या प्रकृती माहिती जाणून घेत आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या पोलिसांना शांतता- सुव्यवस्था कायम ठेवता यावी, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील पोलिसही यंत्रणाही अलर्ट झाली आहे. बाळासाहेबांप्रती शहरवासियांच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शहरातील नागरिकांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह औरंगाबादमधील जवळपास सर्वच नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सामान्य कायकर्ते आणि शहरवासिय बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून असून, त्यासाठी टीव्हीसमोर बसून आहेत. काही शिवसैनिकांनी मंदिरात अभिषेक आणि पूजा करून, बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली व बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खैरे यांच्यासोबत शहर आणि मराठवाड्यातील शिवसेना नेते, प्रमुख कार्यकर्ते सध्या मातोश्रीवरच आहेत. शहरात रात्रीपासूनच बाळासाहेबांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली. त्यामुळे औरंगाबादच्या दिवाळीवर विरजण पडले आहे. लोकांनी फटाके फोडणेही बंद केले असून, शहरवासिय टीव्हीवरील बातम्यांतून बाळासाहेबांच्या प्रकृती माहिती जाणून घेत आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या पोलिसांना शांतता- सुव्यवस्था कायम ठेवता यावी, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील पोलिसही यंत्रणाही अलर्ट झाली आहे. बाळासाहेबांप्रती शहरवासियांच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शहरातील नागरिकांवर चिंतेचे सावट पसरले आहे.