वजन कमी करण्याचे अनेक उपाय आतापर्यंत शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. त्यातील काही उपाय सहजासहजी अंमलात आणणे कठीण असल्याने आपण त्याकडे दूर्लक्षही करतो. पण आता एक अत्यंत सोपा आणि सर्वांना शक्य असणारा उपाय शास्त्रज्ञांनी सूचवला असून, त्यांनी दावा केला आहे, की कुटुंबासोबत जेवण केल्याने वजन नियंत्रित राहते. अमेरिकेतील इलिनॉयस विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. संशोधनात म्हटले आहे, की जे लोक कुटुंबासोबत बसून जेवण करतात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कमी होते. सुमारे दीडशे लोकांना संशोधनात सामील केले होते. त्यातील अध्र्या लोकांना १२ आठवडे एकट्यानेच जेवण करण्यास सांगण्यात आाले तर अध्र्या लोकांना आठवड्यातून किमान ३ दिवस तरी कुटुंबासोबत जेवण्यास सांगण्यात आले. त्यातून हे दिसून आले की, ज्यांनी कुटुंबासोबत जेवण केले त्यांचे वजन १२ टक्के कमी झाले होते.
कुटुंबासोबत जेवण केल्याने वजन नियंत्रित
Written By Aurangabadlive on गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२ | ११:५१ AM
वजन कमी करण्याचे अनेक उपाय आतापर्यंत शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. त्यातील काही उपाय सहजासहजी अंमलात आणणे कठीण असल्याने आपण त्याकडे दूर्लक्षही करतो. पण आता एक अत्यंत सोपा आणि सर्वांना शक्य असणारा उपाय शास्त्रज्ञांनी सूचवला असून, त्यांनी दावा केला आहे, की कुटुंबासोबत जेवण केल्याने वजन नियंत्रित राहते. अमेरिकेतील इलिनॉयस विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. संशोधनात म्हटले आहे, की जे लोक कुटुंबासोबत बसून जेवण करतात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कमी होते. सुमारे दीडशे लोकांना संशोधनात सामील केले होते. त्यातील अध्र्या लोकांना १२ आठवडे एकट्यानेच जेवण करण्यास सांगण्यात आाले तर अध्र्या लोकांना आठवड्यातून किमान ३ दिवस तरी कुटुंबासोबत जेवण्यास सांगण्यात आले. त्यातून हे दिसून आले की, ज्यांनी कुटुंबासोबत जेवण केले त्यांचे वजन १२ टक्के कमी झाले होते.