Home » , , , » भाषणबाजीनेच रंगली कार्यशाळा

भाषणबाजीनेच रंगली कार्यशाळा

Written By Aurangabadlive on बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२ | ११:३८ AM

लोकप्रतिनिधींची दांडी, राष्ट्रीय पदाधिकाèयांचे सरकारवर टीकास्त्र
प्रतिनिधी

औरंगाबाद : सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या शेतकरी-शेतमजूर कार्यशाळेत  कार्यशाळेत शेतकèयांच्या समस्यांवर चर्चा होण्याऐवजी आलेल्या पाहुण्यांनी भाषणबाजीवरच भर दिला. त्यामुळे कार्यशाळेसाठी खास उपस्थित असलेले अखिल भारतीय शेतकरी आणि शेतमजूर काँग्रेसचे प्रभारी व नॅशनल कौन्सिलचे सदस्य अविनाश काकडे नाराज झाले. त्यांनी भरसभेत यावर नाराजी व्यक्त करत, स्वपक्षावर टीका केली. ते म्हणाले, शेतकèयांची कार्यशाळा झाली नसून भाषणे रंगली. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असूनही लोकप्रतिनिधींनी गैरहजेरी लावली! आज शेतकèयांना समस्या भेडसावत आहेत. तहसीलदारांनी लावलेल्या भांडणामुळे शेतकèयांची ६० टक्के प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावर कठोर कायदा झाला पाहिजे,अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
शहरातील सिडको नाट्यगृहात मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश शेतकरी आणि शेतमजूर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय किसान खेतमजुर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास उपासे, जिल्हाध्यक्ष जयराम साळुंके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केशवराव औताडे, माजी खा. उत्तमसिंग पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल, किरण डोणगावकर, सुभाष ठोकळ, अनिल पटेल, प्रा. डॉ. अरुण खरात, प्रा. डॉ. हरके आदी उपस्थित होते.  काकडे म्हणाले की, थेट गुंतवणूक शेतकèयांच्या फायद्याची आहे. त्यामुळे शेतमालाला उत्तम भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शेतकèयांच्या आत्महत्या वाढत असून त्यावर शासन कमिट्या स्थापन करण्याचे काम करीत आहेत. शेतकèयांना पाणी, वीज, बील वाढीमुळे शेतकèयांचे प्रश्न वाढले आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकèयांचे संघटन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकèयांना मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे म्हणाले की, शेतकèयांनी संघटित होण्याची गरज आहे. संघटनेच्या कार्यकत्र्यांनी राजकारणी माणसाला बळी पडू नये. शेतकèयांवर खर्चाच्या योजना शासनाने आणल्या असल्या तरी त्या शेतकèयांपर्यंत पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल यांनी मानले.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.