औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज रात्री औरंगाबादेत मुक्कामी येत आहेत. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन ते टंचाई निवारणाच्या कामांचा आढावा घेणार आहेत.
चव्हाण यांचे आज रात्री ९ वाजता सुभेदारी विश्रामगृहावर येतील. रात्री मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी ८.३० वाजता ते हर्सूल तलावाकडे रवाना होतील. तेथील कामाची पाहणी करतील. त्यानंतर येथून ते चिकलठाण्याकडे प्रयाण करतील. चिकलठाणा येथे मुख्यमंत्री सकाळी ९.१५ वाजता चारा छावणीस भेट देऊन पाहणी करतील. यानंतर सकाळी ९.३५ वाजता ते चिकलठाणा विमानतळाहून हेलिकॉप्टरने पैठणकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.५० वाजता त्यांचे जायकवाडी येथील हेलिपॅडवर आगमन होणार असून, तेथून ते जायकवाडी धरणाकडे प्रयाण करतील. सकाळी १० ते १०.२५ या वेळेत ते जायकवाडी धरणात मनपातर्फे सुरू असलेल्या कालव्याच्या कामाची पाहणी करतील. या पाहणीनंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर पोहोचतील. येथून मोटारीने विभागीय आयुक्तालयात आल्यानंतर दुपारी १२ वाजता ते जिल्ह्यातील टंचाईबाबत बैठक घेणार आहेत. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेलिकॉप्टरने सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरणाकडे रवाना होतील. दुपारी १.३० वाजता खेळणा धरण येथे ते जलपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. येथून हेलिकॉप्टरनेच ते सिल्लोड शहरात पोहोचतील.