भावेंवीण भक्ति
भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४॥
मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीचे अनन्य साधारण असे महत्व आहे.देव हा केवळ भावाचा भुकेला आहे.आपल्या हृदयातील उत्कट भावामुळेच भक्ती फलद्रुप होते. ज्ञानेश्वर माऊली सुध्दा हरिपाठात सांगतात की,भावावांचून भक्ति विषयी बोलणे व्यर्थ आहे. मनुष्याला मुक्तीची प्राप्ती सुध्दा भक्तिमुळेच होऊ शकते. निर्बल व्यक्ती जर म्हणाला की, मी बलशाली आहे. हे म्हणणे जसे व्यर्थ आहे.तदवतच कृतीशिवाय परमार्थ हा व्यर्थ, दुबळा आहे. मनुष्य संसारात उगीच शिणतो,काबाडकष्ट करतो.हरिनामाचे स्मरण करण्यासाठी त्याला वेळ नसतो. हरिनामाच्या अखंड नामस्मरणानेच प्रपंचाचे बंधन तुटतात.ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की,मनुष्याला भवसागर तरण्यासाठी हरिजपासारखे दुसरे अमोघ साधन नाही.कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४॥
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर,मो.9881826258