नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी।पापें अनंत
कोडी गेली त्यांची।।
अनंत जन्मांचे तप एक नाम। सर्व मार्ग सुगम
हरिपाठ ।।
योग याग क्रिया धर्माधर्म माया।गेले ते
विलया हरिपाठ।।
ज्ञानदेवीं यज्ञ योग क्रिया धर्म।
हरिविणें नेम नाही दुजा।।
नामस्मरण आणि संकिर्तन ही वैष्णवांची जोडी
आहे. भगवंताच्या प्राप्ती मार्गात दोन्हीही साधनांना अनन्य साधारण असे महत्व आहे.
हरिनामाच्या स्मरणाने अनंत पातकांच्या पर्वतापेक्षाही मोठया राशी असल्या तरी
सुध्दा त्या नामस्मरणाने क्षणात नष्टप्राय होतात. हा केवळ नामस्मरणाचा महीमा
आहे.अनंत जन्मांत केलेले तप म्हणजे एक हरिनाम होय.ते नाम सर्व मार्गापेक्षा सोपे
आहे.योग,याग, क्रिया ,धर्म,अधर्म ही सर्व माया
आहे. हरिपाठांत सर्वांचा लय होतो.ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की,यज्ञ,योग,क्रिया,धर्म
हे सर्व करण्याची आवश्यकता नसून केवळ हरिनामस्मरण केले तरी भगवंत प्राप्त
होतो.हरिनामावाचून मला दुसरा नेम नाही.
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर मो.९८८१८२६२५८
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर मो.९८८१८२६२५८