प्रतिनिधी
औरंगाबाद : नगर नाका ते गोलवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. रस्त्याच्या एका बाजूला लष्करी जवानांची निवासस्थाने, शाळा, तर दुसèया बाजूला लष्कराचे कार्यालय आहे. त्यामुळे रस्ता रूंदीकरणाला अडथळे येऊ शकतात म्हणून भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी पत्रकारांना दिली.
हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता अरुंद असल्याने येथे झालेल्या अनेक अपघातात शेकडो बळी गेले व अनेक जणांना अपंगत्व आले आहे. या रस्त्याच्या प्रश्नी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी राज्य शासनाला नगर नाका ते गोलवाडी फाट्यादरम्यानची लष्कराची २६.११ एकर जागा हवी आहे. या जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने राज्य शासनाकडून शासनाच्या मालकीच्या छावणीतील निजाम बंगल्याची ११.३२ एकर जागा आणि रुंदीकरणामुळे होणाèया तोडफोडीसाठी ५ कोटी ८६ लाख रुपये मोबदला मागितला आहे. वाहतुकीला आणि जवान व त्यांच्या कुटुंबियांना येणे-जाणे सुरक्षित व सोयीचे व्हावे यासाठी या मार्गावर भुयारी मार्ग तयार करण्याचाही प्रस्ताव असल्याचे जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी सांगितले.