Home » , , » चोरी झाल्यास पोलीस निरीक्षकास दोषी धरणार

चोरी झाल्यास पोलीस निरीक्षकास दोषी धरणार

Written By Aurangabadlive on रविवार, २३ डिसेंबर, २०१२ | १०:२७ AM

औरंगाबादेत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासन हतबल
प्रतिनिधी
औरंगाबाद : गेल्या तीन ते चार दिवसांपासून भरदिवसा घडणाèया धाडशी घरफोड्यांची धास्ती पोलीस प्रशासनाने घेतली असून आज उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचाèयांना सुचना करण्यात आल्या असून यानंतर ज्या पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीची घटना घडेल त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल, असा दम उपायुक्त घार्गे यांनी दिला.
गेल्या तीन दिवसांपासून भरदुपारी घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. बुधवारी समाधान कॉलनीतील रहिवाशी असलेले डॉ. संजय पुराणीक यांचे घर फोडून चोरट्यांनी २६ तोळे वजनाचे दागीने लंपास केले. ही घटना ताजी असतानाच दुसèया दिवशी म्हणजे गुरूवारी सिडको एन-२ भागातील कामगार कॉलनी येथे राहणारे मुकेश कपूर यांच्या दुसèया मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी भरदुपारी तोडले. दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी बँकेच्या लॉकरमधून आणलेले ३१ तोळ्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. काल तर चोरट्यांनी हॅट्ट्रिकच केली. चेतनानगर येथे सी-७ या इमारतीमध्ये दुसèया मजल्यावर प्रदिपकुमार ठोले यांचा फ्लॅट आहे. चोरट्यांनी काल दुपारीच त्यांच्या घराला लक्ष्य केले. कुलूप तोडून साडेतेरा तोळ्याचे दागीने लंपास केले. चोरट्यांच्या या भरदिवसाच्या कारनाम्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आज सकाळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हे प्रकटीकरण (डि.बी.)शाखेची बैठक घेतली. या बैठकीत श्री. घार्गे यांनी कर्मचाèयांना विशेष सुचना करून घटनेचे गांभीर्य ओळखण्याचे सांगितले. बैठकीनंतर उपायुक्त श्री. घार्गे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, शहरातील घर‘ोड्या रोखण्यासाठी नव्याने मोर्चे बांधणी करण्यात आली असून त्यासाठी आज प्रत्येक पोलीस ठाण्यातील डि.बी. कर्मचाèयांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली. यापूर्वी बिट मार्शल आपल्या बीटमध्येच गस्त घालीत होते. यापुढे ते संपूर्ण पोलीस ठाण्यात गस्त घालतील. कॉलनीत ज्या बंगल्यात अथवा अपार्टमेंट येथे वॉचमन राहतील त्यांच्याकडे बीटबूक राहिल. त्यामध्ये बिटमार्शल दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये तीन वेळेस सह्या करतील. यामुळे काही प्रमाणात का होईना गुन्हेगारांना वचक बसेल, असे घार्गे यांनी स्पष्ट केले. यापुढे ज्या पोलीस ठाणे हद्दित घरफोडीची घटना घडेल, तेथील पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल. शहरात घडत असलेल्या चोरीच्या घटना qचताजनक असून यामागे अट्टल गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची तसेच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या आरोपींची चौकशी करीत असल्याचे घार्गे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही दक्ष राहून अनोळखी इसमांवर वॉच ठेवावा. कोणावर शंका आल्यास त्यांनी थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.