प्रतिनिधी
औरंगाबाद : पुढील महिन्यात अहमदनगर येथे सुतार-लोहार समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्याला समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघाचे अध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांनी केले आहे.
चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलन करून बैठकीचे उद््घाटन करण्यात आले. राज्यभरातून बैठकीसाठी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध सूचना आल्या. सुतार-लोहार समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा यासह विविध मागण्यांवरही यावेळी चर्चा झाली. प्रदेश कार्याध्यक्ष भिकाजीअप्पा जगताप, प्रदेश सचिव भगवानराव राऊत, प्रदेश संघटक वाल्मीक सुरासे, सरचिटणीस बापूसाहेब सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पगार, कार्याध्यक्ष जयवंत गाडेकर, जिल्हाध्यक्ष बबनराव पवार, उद्योगपती के. डी. शादरूल, महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला सिरसाठ आदींनीही या बैठकीत मते मांडली. शहराध्यक्ष राजू सालपे, गंगाधर पांचाळ, मनोहर बोरसे, किशोर शेलार, बाळासाहेब राजगुरू, भगवानराव सोनवणे, संजय राऊत, उद्धवराव थोराईत, सीताराम सपकाळ आदींनी बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
औरंगाबाद : पुढील महिन्यात अहमदनगर येथे सुतार-लोहार समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्याला समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघाचे अध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांनी केले आहे.
चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलन करून बैठकीचे उद््घाटन करण्यात आले. राज्यभरातून बैठकीसाठी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध सूचना आल्या. सुतार-लोहार समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा यासह विविध मागण्यांवरही यावेळी चर्चा झाली. प्रदेश कार्याध्यक्ष भिकाजीअप्पा जगताप, प्रदेश सचिव भगवानराव राऊत, प्रदेश संघटक वाल्मीक सुरासे, सरचिटणीस बापूसाहेब सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पगार, कार्याध्यक्ष जयवंत गाडेकर, जिल्हाध्यक्ष बबनराव पवार, उद्योगपती के. डी. शादरूल, महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला सिरसाठ आदींनीही या बैठकीत मते मांडली. शहराध्यक्ष राजू सालपे, गंगाधर पांचाळ, मनोहर बोरसे, किशोर शेलार, बाळासाहेब राजगुरू, भगवानराव सोनवणे, संजय राऊत, उद्धवराव थोराईत, सीताराम सपकाळ आदींनी बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.