याविण पाखंड नेणे काही।।
अंतरी विश्वास अखंड नामाचा।
काया नेवाचा देई हेचि।।
तुझे नामी रंग भरो मन।
तुका म्हणे देई संतसंग ।।
प्रस्तुत अभंग
जगतगुरू तुकाराम महाराज यांचा हरी नामाचा महीमा सांगणारा आहे. हरि नामाचे अखंड
नामस्मरण करणार्या
भक्ताच्या जीवनाचा
कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात , भक्तांने हरिनामाचे
स्मरण करतांना कुठल्याही प्रकारचे पाखंड, दिखावा न करता केवळ
शुध्द भाव ,भक्तीने ,केवळ
गायन केल्यास भक्ताला अंतरिक विश्वास,शांती
समाधान मिळते.ज्यांना आपल्या जीवनामध्ये शांती ,सुख
,समाधान मिळवायचे
असेल त्यांना केवळ हरिनामाचे गायन केल्यास ते मिळू शकते असे विश्वासाने तुकाराम
महाराज सांगतात. संताच्या समागमाने ,दर्शनाने भक्तांच्या
पापाचा नाश होऊन पुण्य पदरात पडते.अंतःकरण शुध्द व पवित्र होते. भक्तांच्या हृदयात
हरिचा नित्य ,अखंड वास राहतो. म्हणून तुकाराम महाराज
म्हणतात,मला घडोघडी सतसंग घडून मला देवाच्या नामस्मरणात रंगू दे.
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद आश्रम,
मो.९९२३२०९६५८