प्रतिनिधी
औरंगाबाद : शेजाèयाच्या घरासमोर लोखंडी पलंग टाकून येण्याजाण्यास अडथळा करणाèया जाधवमंडी येथील धनशाम बारीवाले व त्यांच्या अन्य साथिदारांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. वनकोरे यांनी चांगल्या वर्तवणुकीच्या एक वर्षाच्या बंधपत्रावर मुक्त केले. जाधवमंडी येथील रहिवाशी दिगंबर गोपालदास रावळ यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनशाम बारीवाले, मालनबाई बारीवाले आणि उमेश बरेडीया या तिघांनी दिगंबर रावळ यांच्या घरासमोर पलंग आणि बल्ल्या टाकून अडथळा निर्माण केला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सरकारी वकील शाम देशपांडे यांनी ४ साक्षीदार तपासून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिध्द केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींचा पहिला गुन्हा असल्यामुळे चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर एक वर्षाच्या बंधपत्रावर सर्व आरोपींची मुक्तता केली.