प्रतिनिधी
औरंगाबाद : धुळे शहरातील अस्वच्छता, त्यामुळे डेंग्युसह पसरलेली रोगराई आणि महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच संबंधित इतर यंत्रणांचे स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरुद्ध अॅड. राजश्री पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, यावर दोन वेळा सुनावणी होऊन खंडपीठाने शहर स्वच्छता तसेच इतर अनुषंगिक बाबींसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत.
धुळे शहरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून, कचराकुंड्या, साचलेली डबकी, डासांचे साम्राज्य यामुळे शहरवासीय त्रस्त झाले होते. या अस्वच्छतेमुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आणि अनेकांना डेंग्युसुद्धा झाला. अनेकजण रुग्णालयांत उपचार घेत असून, यात काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. शहर स्वच्छतेची आणि आरोग्याची जबाबदारी असणाèया मनपा, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांचे याकडे दुर्लक्ष होत असून शहरवासीयांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने, संबंधित विभागांना स्वच्छता आणि आरोग्यासंदर्भात सूचना द्याव्यात, काम न करणाèया अधिकाèयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका धुळे येथील अॅड. राजश्री पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. सबाहत तारीक काझी यांच्यामार्फत दाखल केली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी याचिकाकत्र्यांतर्फे अॅड. श्रीमती सबाहत काझी, शासनातर्फे अॅड. अर्चना गोंधळेकर, महापालिकेतर्फे एम. एस. कुलकर्णी तर जिल्हा परिषदेतर्फे अॅड. ज्ञानेश्वर बागूल काम पाहत आहेत.
औरंगाबाद : धुळे शहरातील अस्वच्छता, त्यामुळे डेंग्युसह पसरलेली रोगराई आणि महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच संबंधित इतर यंत्रणांचे स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरुद्ध अॅड. राजश्री पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, यावर दोन वेळा सुनावणी होऊन खंडपीठाने शहर स्वच्छता तसेच इतर अनुषंगिक बाबींसंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत.
धुळे शहरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून, कचराकुंड्या, साचलेली डबकी, डासांचे साम्राज्य यामुळे शहरवासीय त्रस्त झाले होते. या अस्वच्छतेमुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आणि अनेकांना डेंग्युसुद्धा झाला. अनेकजण रुग्णालयांत उपचार घेत असून, यात काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. शहर स्वच्छतेची आणि आरोग्याची जबाबदारी असणाèया मनपा, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांचे याकडे दुर्लक्ष होत असून शहरवासीयांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने, संबंधित विभागांना स्वच्छता आणि आरोग्यासंदर्भात सूचना द्याव्यात, काम न करणाèया अधिकाèयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका धुळे येथील अॅड. राजश्री पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. सबाहत तारीक काझी यांच्यामार्फत दाखल केली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी याचिकाकत्र्यांतर्फे अॅड. श्रीमती सबाहत काझी, शासनातर्फे अॅड. अर्चना गोंधळेकर, महापालिकेतर्फे एम. एस. कुलकर्णी तर जिल्हा परिषदेतर्फे अॅड. ज्ञानेश्वर बागूल काम पाहत आहेत.