सिंधी कॉलनीतील गेट काढण्यासाठी आलेल्या मनपा पथकाशी सिंधी कॉलनीतील नागरिकांनी हुज्जत घातली. |
सिंधी कॉलनीतील हाऊसिंग सोसायटीकडून गेट
प्रतिनिधी
औरंगाबाद : मनपाने गेट काढल्यानंतरही पून्हा सिंधी कॉलनीतील हाऊसिंग सोसायटीकडून गेट लावण्यात आल्यामुळे संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी खा. चंद्रकांत खैरे यांना घेराव घालत सदरील गेट हटविण्याची मागणी केली.
सिंधी कॉलनीतील सोसायटीने परिसरात गेट लावले होते. त्याबद्दल तक्रारी आल्यानंतर लोकांना ये - जा करता यावी म्हणून महापालिकेने ते गेट काढले. मात्र, ते पुन्हा लावण्यात आल्याने संतापलेल्या विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, अरिहंतनगर, बालाजीनगर, उत्तमनगर परीसरातील नागरीकांनी राधाकृष्ण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खा. खैरे यांना घेराव घालून गेट हटवण्याची मागणी केली. खा. खैरे यांनी मनपाचे उपायुक्त निकम व नगर रचनाविभागातील डी. पी. कुलकर्णी यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत संबधीत प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याच्या त्यांनी सुचना केल्या. दरम्यान, सिंधी कॉलनी परीसरात पून्हा बसविण्यात आलेले गेट सायंकाळपर्यंत काढण्याचे आदेश आयुक्त डॉ. भापकर यांनी अधिकाèयांना दिले.
सिंधी कॉलनीतील सोसायटीने परिसरात गेट लावले होते. त्याबद्दल तक्रारी आल्यानंतर लोकांना ये - जा करता यावी म्हणून महापालिकेने ते गेट काढले. मात्र, ते पुन्हा लावण्यात आल्याने संतापलेल्या विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, अरिहंतनगर, बालाजीनगर, उत्तमनगर परीसरातील नागरीकांनी राधाकृष्ण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खा. खैरे यांना घेराव घालून गेट हटवण्याची मागणी केली. खा. खैरे यांनी मनपाचे उपायुक्त निकम व नगर रचनाविभागातील डी. पी. कुलकर्णी यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत संबधीत प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याच्या त्यांनी सुचना केल्या. दरम्यान, सिंधी कॉलनी परीसरात पून्हा बसविण्यात आलेले गेट सायंकाळपर्यंत काढण्याचे आदेश आयुक्त डॉ. भापकर यांनी अधिकाèयांना दिले.