प्रतिनिधी
औरंगाबाद : देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाèया नीट परीक्षेसाठी राज्यात केवळ सहा केंद्रांना मान्यता मिळाल्याने विद्याथ्र्यांत प्रचंड रोष आहे. परीक्षा केंद्रांची संख्या कमी असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ५ मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राज्यात केवळ ६ परीक्षा केंद्रांना मान्यता दिली आहे. पूर्वी एमएचटी-सीईटी ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घेतली जात होती. परीक्षेला बसणाèया विद्याथ्र्यांची संख्या लक्षात घेता अपुèया केंद्रामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांवर तर हा निर्णय अन्यायकारक आहे. कारण परीक्षेच्या किमान एक दिवस अगोदर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागेल. यात वेळ व पैशांना अपव्यय होणार असून एकाच वेळी अनेक विद्यार्थी केंद्रस्थळी येणार असल्याने मोठी गैरसोय होणार आहे. अशा परीक्षांमध्ये एका-एका गुणाला महत्व असते. परंतु विद्याथ्र्यांचे दोन दिवस प्रवासात जाणार असल्याने त्याचा अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. हा सर्व प्रकार लक्षात घेता परीक्षा केंद्रामध्ये वाढ करावी, अशी मागणी जवळपास दोनशे विद्याथ्र्यांनी जिल्हाधिकाèयांकडे केली आहे. विद्याथ्र्यांचे सीईटी परीक्षेचे ओझे कमी करण्यासाठी देशपातळीवर एकच सीईटी घेण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे. परंतु, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी स्वतंत्र सीईटी घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे एका चांगल्या निर्णयाला खोडा बसण्याची शक्यता असून विद्याथ्र्यांवरही अतिरिक्त ताण पडणार आहे. तेव्हा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र सीईटी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत आहे.