औरंगाबादेत प्रकाश आंबेडकरांचे विधान
प्रतिनिधी
प्रतिनिधी
औरंगाबाद : भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत केलेल्या विधानामुळे राजकीय- सामाजिक वर्तूळात खळबळ उडाली असून, त्यांनी अफजल गुरूला फाशी न देण्याची मागणी केली आहे. त्याला फाशी दिल्यास तो शहीद ठरवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये नेतृत्वहीन झालेली फुटीरतावाद्यांची चळवळ यामुळे पुन्हा एकवटेल आणि काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कसाबला फासावर चढवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला अशाच पद्धतीने फासावर लटकवणार असल्याची घोषणा केली होती. त्या पाश्र्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्त्व आले आहे. भाजपसह अन्य संघटनांतर्फेही अफजलला तातडीने फाशी देण्याची मागणी होत असताना, प्रकाश आंबेडकर यांनी आज, शनिवारी औरंगाबादेत पत्रपरिषदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, अफजलच्या फाशीच्या संदर्भातील दयेचा अर्ज निकाली काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यावर त्यांनीच निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र सुशीलकुमार यांच्या घोषणेने राष्ट्रपती काँग्रेसच्या मंत्र्यांचे ऐकत असावेत, असे वाटते. अफजल गुरुला फाशी देण्यात येऊ नये. कारण अफजलला फाशी दिल्यास काश्मीरमध्ये असलेल्या फुटीरवादी संघटनांना नवा चेहरा मिळेल. या संघटनांचे बळ एकवटेल. सध्या असंघटितपणे सुरू असलेले त्यांचे आंदोलन संघटित होईल. त्यामुळे मोठा उठाव होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. गेल्या वीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असंघटित आणि फुटीरतावाद्यांचे आंदोलन सुरू आहे. तरीही ८० टक्के लोक हे आजही भारताच्या बाजूने आहे, आम्हाला सन्मानाने वागवावे, अशी त्यांची मागणी आहे. वीस वर्षांत काश्मीरच्या फुटीरवाद्यांना नेता मिळाला नाही, तरीही आंदोलन जिवंत आहे. अफजल गुरुला फाशी दिली, तर त्याला हुतात्मा म्हणून जाहीर करतील, या निमित्ताने फुटीरवादी आंदोलनकत्र्यांना नेता मिळेल आणि भविष्यात काश्मीर पेटून उठेल. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला लष्कराद्वारे कंटड्ढोल करत बसणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पत्रपरिषदेला मराठवाडा अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, प्रा. अविनाश डोळस, गौतम लांडगे, अॅड. बी. एच. गायकवाड, रामभाऊ पेरकर, जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदी उपस्थित होते.
कसाबला फासावर चढवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला अशाच पद्धतीने फासावर लटकवणार असल्याची घोषणा केली होती. त्या पाश्र्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्त्व आले आहे. भाजपसह अन्य संघटनांतर्फेही अफजलला तातडीने फाशी देण्याची मागणी होत असताना, प्रकाश आंबेडकर यांनी आज, शनिवारी औरंगाबादेत पत्रपरिषदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, अफजलच्या फाशीच्या संदर्भातील दयेचा अर्ज निकाली काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यावर त्यांनीच निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र सुशीलकुमार यांच्या घोषणेने राष्ट्रपती काँग्रेसच्या मंत्र्यांचे ऐकत असावेत, असे वाटते. अफजल गुरुला फाशी देण्यात येऊ नये. कारण अफजलला फाशी दिल्यास काश्मीरमध्ये असलेल्या फुटीरवादी संघटनांना नवा चेहरा मिळेल. या संघटनांचे बळ एकवटेल. सध्या असंघटितपणे सुरू असलेले त्यांचे आंदोलन संघटित होईल. त्यामुळे मोठा उठाव होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. गेल्या वीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असंघटित आणि फुटीरतावाद्यांचे आंदोलन सुरू आहे. तरीही ८० टक्के लोक हे आजही भारताच्या बाजूने आहे, आम्हाला सन्मानाने वागवावे, अशी त्यांची मागणी आहे. वीस वर्षांत काश्मीरच्या फुटीरवाद्यांना नेता मिळाला नाही, तरीही आंदोलन जिवंत आहे. अफजल गुरुला फाशी दिली, तर त्याला हुतात्मा म्हणून जाहीर करतील, या निमित्ताने फुटीरवादी आंदोलनकत्र्यांना नेता मिळेल आणि भविष्यात काश्मीर पेटून उठेल. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला लष्कराद्वारे कंटड्ढोल करत बसणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पत्रपरिषदेला मराठवाडा अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, प्रा. अविनाश डोळस, गौतम लांडगे, अॅड. बी. एच. गायकवाड, रामभाऊ पेरकर, जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदी उपस्थित होते.