प्रतिनिधी
औरंगाबाद : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम करुन महाभारताच्या युध्दभूमीवरून जो दिव्य व महान संदेश दिला तो आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये तेवढाच प्रासंगीक, प्रेरणादायी व जीवनोपयोगी आहे. गीता एक शास्त्र आहे. ज्याला गीता शास्त्र अवगत झाले तो जीवनात यशस्वी होतोच होतो, असे प्रतिपादन प्रेमावतार, युगदृष्टा, क्रांतीकारी वैज्ञानिक संत श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी आज संत तुकाराम नाट्यगृह, सिडको, येथे आयोजित सगुण भक्ती सत्संग सोहळ्यात केले.
ते पुढे म्हणाले परमेश्वराने मानवाला विवेकबुध्दी दिली, चांगले काय? वाईट काय? याची निवड करण्याची शक्ती दिली. कोणतेही कर्म करताना विचारपूर्वक, विवेकाने त्या कार्याची, कर्माची निवड करा, करावयाच्या कार्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करा आणि अत्यंत अंत:करणापूर्वक परमेश्वराला स्मरून अत्यंत भक्तीपूर्वक ते कार्य करा. कार्य सिध्दीस जाईल हे निश्चित, कोणत्याही कार्यासंबंधी जर ज्ञान नसेल तरी ते कार्य करा. आपल्या अमृतवाणीमध्ये दिव्य संदेश देताना ते म्हणाले, श्रीमद्भगवतगीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्म, भक्ती व ज्ञानयोगाचा अनोखा संगम आहे. भगवान श्रीकृष्णाने विदीत केलेल्या या कर्म, भक्ती व ज्ञान योगाप्रमाणे जोआचरण करेल तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये दिव्यता, उच्चता व महानता प्रवेश करेल. ते पुढे म्हणाले नुसते कर्म करुन जीवन तर जगता येईल पणा जीवनाचे सौंदर्य जर विकसित करावयाचे असेल, परमेश्वराचा शाश्वत परमानंद प्राप्त करायचा असेल तर कर्माच्या बरोबर ज्ञान व भक्तीचा सुंदर समन्वय साधणे गरजेचे आहे. आशा हेच दु:खाचे मूळ, यासाठी कर्तव्याचे पालन करा, परमेश्वराचे चिंतन करता करताआपले कर्तव्य करत रहा. तुम्ही स्वत:ची इतकी काळजी घेऊ शकणार नाही. जितका परमेश्वर व सदगुरू क्षणक्षणाला तुमची चिंता करतात. तुम्ही चिंता करुन काय मिळणार, तुमचं स्वास्थ खराब कराल. चिंतन व स्वभाव खराब कराल यापेक्षा तुमची चिंता दृढ विश्वासाने परमात्मा परमेश्वरावर सोपवा तुम्हाला चिंता करण्याचे कारण राहणार नाही, असेही स्वामींनी स्पष्ट केले.
औरंगाबाद : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम करुन महाभारताच्या युध्दभूमीवरून जो दिव्य व महान संदेश दिला तो आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये तेवढाच प्रासंगीक, प्रेरणादायी व जीवनोपयोगी आहे. गीता एक शास्त्र आहे. ज्याला गीता शास्त्र अवगत झाले तो जीवनात यशस्वी होतोच होतो, असे प्रतिपादन प्रेमावतार, युगदृष्टा, क्रांतीकारी वैज्ञानिक संत श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी आज संत तुकाराम नाट्यगृह, सिडको, येथे आयोजित सगुण भक्ती सत्संग सोहळ्यात केले.
ते पुढे म्हणाले परमेश्वराने मानवाला विवेकबुध्दी दिली, चांगले काय? वाईट काय? याची निवड करण्याची शक्ती दिली. कोणतेही कर्म करताना विचारपूर्वक, विवेकाने त्या कार्याची, कर्माची निवड करा, करावयाच्या कार्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करा आणि अत्यंत अंत:करणापूर्वक परमेश्वराला स्मरून अत्यंत भक्तीपूर्वक ते कार्य करा. कार्य सिध्दीस जाईल हे निश्चित, कोणत्याही कार्यासंबंधी जर ज्ञान नसेल तरी ते कार्य करा. आपल्या अमृतवाणीमध्ये दिव्य संदेश देताना ते म्हणाले, श्रीमद्भगवतगीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्म, भक्ती व ज्ञानयोगाचा अनोखा संगम आहे. भगवान श्रीकृष्णाने विदीत केलेल्या या कर्म, भक्ती व ज्ञान योगाप्रमाणे जोआचरण करेल तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये दिव्यता, उच्चता व महानता प्रवेश करेल. ते पुढे म्हणाले नुसते कर्म करुन जीवन तर जगता येईल पणा जीवनाचे सौंदर्य जर विकसित करावयाचे असेल, परमेश्वराचा शाश्वत परमानंद प्राप्त करायचा असेल तर कर्माच्या बरोबर ज्ञान व भक्तीचा सुंदर समन्वय साधणे गरजेचे आहे. आशा हेच दु:खाचे मूळ, यासाठी कर्तव्याचे पालन करा, परमेश्वराचे चिंतन करता करताआपले कर्तव्य करत रहा. तुम्ही स्वत:ची इतकी काळजी घेऊ शकणार नाही. जितका परमेश्वर व सदगुरू क्षणक्षणाला तुमची चिंता करतात. तुम्ही चिंता करुन काय मिळणार, तुमचं स्वास्थ खराब कराल. चिंतन व स्वभाव खराब कराल यापेक्षा तुमची चिंता दृढ विश्वासाने परमात्मा परमेश्वरावर सोपवा तुम्हाला चिंता करण्याचे कारण राहणार नाही, असेही स्वामींनी स्पष्ट केले.