प्रतिनिधी
औरंगाबाद : जननायक दादासाहेब गायकवाड यांच्यावर आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासकांनी फार मोठा अन्याय केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या कार्याला खèया अर्थाने दादासाहेबांनी पुढे नेले. त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची ताकद होती. दादासाहेबांच्या कार्यावर समर्पक प्रकाश टाकण्याचे काम अरुण रसाळ यांनी जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड या ग्रंथाच्या माध्यमातून केले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात डॉ. गव्हाणे बोलत होते. ऊरूवेला प्रकाशनाच्या वतीने काढण्यात आलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील पहिल्या गायरान जमिन हक्क धारक समिन्द्राबाई दणके यांच्या हस्ते झाले. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश पुरी, सामाजिक कार्यकत्र्या मंगल खिवंसरा, डॉ. संजीवकुमार सावळे उपस्थित होते. १९६४ मध्ये दादासाहेब गायकवाड सर्वसाधारण मतदार संघातून निवडून आले होते. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही ते अग्रेसर होते. गायरान जमिन हक्क चळवळीतील त्यांचे कार्य मोलाचे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ जशी भूीहिनांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तशीच ती देशाच्या दृष्टीनेही कशी महत्त्वाची आहे हे देशपातळीवरील नेतृत्त्वाला पटवून दिले. या चळवळीमुळेच देशातील लाखो भूमिहीनांना जमिन मिळाली. स्वाभिमानाने जगण्याचा आधार मिळाला असे डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले. जमिनीचा हक्क हा केवळ उपजीविकेचे साधन नसून तो स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असतो. हा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनंतर दादासाहेब गायकवाडांनी केले. रसाळ यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा केलेला अभ्यास हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे, असे मत यावेळी मंगल खिवंसरा यांनी नोंदवले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे, श्रीकांत भराडे, नंदकुमार जोगदंड, डॉ. विलास इप्पर, विद्यापीठ संसद सचिव वर्षा खेडकर, सजगच्या सरस्वती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार हसन इनामदार यांनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात डॉ. गव्हाणे बोलत होते. ऊरूवेला प्रकाशनाच्या वतीने काढण्यात आलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील पहिल्या गायरान जमिन हक्क धारक समिन्द्राबाई दणके यांच्या हस्ते झाले. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश पुरी, सामाजिक कार्यकत्र्या मंगल खिवंसरा, डॉ. संजीवकुमार सावळे उपस्थित होते. १९६४ मध्ये दादासाहेब गायकवाड सर्वसाधारण मतदार संघातून निवडून आले होते. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही ते अग्रेसर होते. गायरान जमिन हक्क चळवळीतील त्यांचे कार्य मोलाचे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ जशी भूीहिनांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तशीच ती देशाच्या दृष्टीनेही कशी महत्त्वाची आहे हे देशपातळीवरील नेतृत्त्वाला पटवून दिले. या चळवळीमुळेच देशातील लाखो भूमिहीनांना जमिन मिळाली. स्वाभिमानाने जगण्याचा आधार मिळाला असे डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले. जमिनीचा हक्क हा केवळ उपजीविकेचे साधन नसून तो स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असतो. हा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनंतर दादासाहेब गायकवाडांनी केले. रसाळ यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा केलेला अभ्यास हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे, असे मत यावेळी मंगल खिवंसरा यांनी नोंदवले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे, श्रीकांत भराडे, नंदकुमार जोगदंड, डॉ. विलास इप्पर, विद्यापीठ संसद सचिव वर्षा खेडकर, सजगच्या सरस्वती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार हसन इनामदार यांनी मानले.