प्रतिनिधी
औरंगाबाद : रिझव्र्ह बँकेने उल्कानगरीतील विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेवर दोन महिन्यांपासून अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मात्र हाल होत आहेत. एनपीए (नॉन परफॉर्मिंग अँसेट) ६० टक्क्यांपर्यंत वाढल्याने ही कारवाई झाली आहे. त्यानुसार निर्बंध उठेपर्यंत खातेदारांना खात्यातून एकदाच एक हजार रुपये काढता येणार आहेत. खातेदारांमध्ये यामुळे चिंता निर्माण झाली असून, साडेआठ हजार खातेदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
१४ सप्टेंबर २०१२ पासून हे निर्बंध लादलेले आहेत. कर्जाचे वितरण, बचत खाते, नवीन खाते सुरू करणे, नव्या ठेवी स्वीकारणे, नवीन कर्ज देण्यास मनाई आहे. ऐन दिवाळीतही या नव्या निर्बंधांमुळे ग्राहकांना पैसे काढता आले नाहीत. सध्या बँके केवळ वसुलीच करू शकते, असे सांगण्यात आले. बँकेने २००८-२००९ या वर्षापर्यंत ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटले. त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये वसूल करण्यात बँकेला अपयश आले आहे. त्यामुळे एनपीए ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाला. बँकेत सध्या साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
औरंगाबाद : रिझव्र्ह बँकेने उल्कानगरीतील विश्वकर्मा नागरी सहकारी बँकेवर दोन महिन्यांपासून अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मात्र हाल होत आहेत. एनपीए (नॉन परफॉर्मिंग अँसेट) ६० टक्क्यांपर्यंत वाढल्याने ही कारवाई झाली आहे. त्यानुसार निर्बंध उठेपर्यंत खातेदारांना खात्यातून एकदाच एक हजार रुपये काढता येणार आहेत. खातेदारांमध्ये यामुळे चिंता निर्माण झाली असून, साडेआठ हजार खातेदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
१४ सप्टेंबर २०१२ पासून हे निर्बंध लादलेले आहेत. कर्जाचे वितरण, बचत खाते, नवीन खाते सुरू करणे, नव्या ठेवी स्वीकारणे, नवीन कर्ज देण्यास मनाई आहे. ऐन दिवाळीतही या नव्या निर्बंधांमुळे ग्राहकांना पैसे काढता आले नाहीत. सध्या बँके केवळ वसुलीच करू शकते, असे सांगण्यात आले. बँकेने २००८-२००९ या वर्षापर्यंत ३ कोटी रुपयांचे कर्ज वाटले. त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये वसूल करण्यात बँकेला अपयश आले आहे. त्यामुळे एनपीए ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाला. बँकेत सध्या साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.