प्रतिनिधी
औरंगाबाद : कापूस खुल्या बाजारात चढ्या भावाने विक्री होत असून, याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने औरंगाबादसह जालना, नगर जिल्ह्यात अठरा कापूस खरेदी केंद्रामार्फत चार लाख क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे.
यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. धरणांनी तळ गाठला असून, विहिरींत पुरेसे पाणी नाही. शेतकèयांच्या हाती कोणतेही पीक उरले नसून बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकèयांना खरीप हंगामात कापसाचा पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने यंदाही कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच खुल्या बाजारपेठेत शेतकèयांच्या कापसाला ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईत शेतकèयांना पीकांचे उत्पादन घ्यावे लागत असताना समाधानकारक भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल होत आहेत. यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे कापसाला सोन्याचा भाव आला आहे. औरंगाबाद, जालना, नगर जिल्ह्यात कापूस महासंघाने अठरा ठिकाणी कापूस खरेदी केंद्र उघडण्यात आले आहेत. यात करमाड, बाजारसावंगी, बालानगर, पाचोड, सिल्लोड, भोकरदन, जाफ्राबाद, खा.फाटा, वैरागड-अनंत, शिवूर, विठ्ठलपूर, सामणगाव, बदनापूर, अंबड, कुंभारपिंपळगाव, परतूर, वाटूर, शेवगाव याठिकाणी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीसाठी सुरुवात झाली आहे. यासाठी शासनाने ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० प्रति क्विंटल कापसाचे भाव ठरविण्यात आले आहेत. कापूस खरेदीत लांब धाग्याच्या कापसासाठी ३९०० रुपये, एस-६ कापसाच्या प्रकारासाठी ३८०० रुपये भाव दिला जाणार आहे तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ३ हजार ४५० रुपये भाव ठरविण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून तिन्ही जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रातून यंदा ४ लाख क्विंटल कापूस खरेदी केला जाणार असल्याची माहिती पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक विजय बोरसे यांनी दिली. गत २००७-०८ या वर्षी कापूस महासंघामार्फत कापूस खरेदी केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सध्या खुल्या बाजारात चार हजार रुपयांपेक्षा भावाने कापूस खरेदी केला जात आहे. परंतु शासनाने निर्धारित केलेल्या भावाप्रमाणे कापसाची खरेदी केली जाणार असल्यामुळे यंदा शेतकèयांना कापसाचा परतावा त्वरीत देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : कापूस खुल्या बाजारात चढ्या भावाने विक्री होत असून, याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने औरंगाबादसह जालना, नगर जिल्ह्यात अठरा कापूस खरेदी केंद्रामार्फत चार लाख क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे.
यावर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. धरणांनी तळ गाठला असून, विहिरींत पुरेसे पाणी नाही. शेतकèयांच्या हाती कोणतेही पीक उरले नसून बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकèयांना खरीप हंगामात कापसाचा पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्याने यंदाही कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच खुल्या बाजारपेठेत शेतकèयांच्या कापसाला ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईत शेतकèयांना पीकांचे उत्पादन घ्यावे लागत असताना समाधानकारक भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल होत आहेत. यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे कापसाला सोन्याचा भाव आला आहे. औरंगाबाद, जालना, नगर जिल्ह्यात कापूस महासंघाने अठरा ठिकाणी कापूस खरेदी केंद्र उघडण्यात आले आहेत. यात करमाड, बाजारसावंगी, बालानगर, पाचोड, सिल्लोड, भोकरदन, जाफ्राबाद, खा.फाटा, वैरागड-अनंत, शिवूर, विठ्ठलपूर, सामणगाव, बदनापूर, अंबड, कुंभारपिंपळगाव, परतूर, वाटूर, शेवगाव याठिकाणी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीसाठी सुरुवात झाली आहे. यासाठी शासनाने ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० प्रति क्विंटल कापसाचे भाव ठरविण्यात आले आहेत. कापूस खरेदीत लांब धाग्याच्या कापसासाठी ३९०० रुपये, एस-६ कापसाच्या प्रकारासाठी ३८०० रुपये भाव दिला जाणार आहे तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी ३ हजार ४५० रुपये भाव ठरविण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून तिन्ही जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रातून यंदा ४ लाख क्विंटल कापूस खरेदी केला जाणार असल्याची माहिती पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक विजय बोरसे यांनी दिली. गत २००७-०८ या वर्षी कापूस महासंघामार्फत कापूस खरेदी केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सध्या खुल्या बाजारात चार हजार रुपयांपेक्षा भावाने कापूस खरेदी केला जात आहे. परंतु शासनाने निर्धारित केलेल्या भावाप्रमाणे कापसाची खरेदी केली जाणार असल्यामुळे यंदा शेतकèयांना कापसाचा परतावा त्वरीत देण्यात येणार आहे.