ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
- संत चोखामेळा
संत चोखामेळा आधुनिक विचार सरणीचे पुरस्कर्ते होते. समाजातील वाईट चालीरितीत बदल घडलाच पाहिजे हा विचारावर चोखामेळा विशेष भर देत. जग हे नेहमीच बाहय सौंदर्याला मोहून जाते. मनुष्य बाहयरंगावर फसुन जातो अंतरिकसौंदर्याची त्याला कल्पनाच येवू शकत नाही.बाहयरंगापेक्षा अतंरगाची सुंदरता अधिक शाश्वत व सत्य असते. संत चोखामेळा प्रस्तुत अभंगातुन प्रत्येक मानव जातीला अत्यंत मौलिक संदेश सांगताना म्हणतात ,ऊस दिसायला जरी वेडा वाकडा असला तरी त्याचा रस मधुर,गोडच असतो.धनुष्य दिसायला जरी वाकडा असेल तरी त्यामधून सुटणार तीर हा सरळच असतो. नदी वेडया वाकडया मार्गाने जरी प्रवाहीत होत असली तरी तीचे पाणी वाकडे नसते. त्या पाण्याने पथीत व्यक्तीची तान्हणच भागेल.चोखा जरी हिन असेल तरी त्यांची भक्ती हिन ठरत नाही. त्याचा ईश्वरा प्रती असलेला भाव अतुट आहे. म्हणून वरपांगी दिसणार्या सौदर्यांला भुलून जाऊ नका असा संदेश चोखामेळा हया अभंगातुन प्रत्येक व्यक्तीला देतात.चोखामेळा सांगतात की, प्रत्येक व्यक्तीचा अंतरंगरूपी आरसा जोपर्यंत स्वच्छ ,सुंदर होत नाही तोपर्यंत तो बाहयरूपालाच भाळेल आतील सौंदर्य त्याला दिसु शकणार नाही.कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
- संत चोखामेळा
-संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर ,
मो.९९२३२०९६५८
विवेकानंद नगर ,
मो.९९२३२०९६५८