प्रतिनिधी
औरंगाबाद : दिवाळी सणात एसटी महामंडळाची चांदी झाली असली तरी शहर बससेवेचं मात्र दिवाळं निघालं. या दिवाळीत जिल्ह्यात २ लाख कि.मी. अंतर एस.टी. बसेसने कापून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. परंतु सिटी बसेसला प्रति दिन वीस हजारांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात दसरा-दिवाळी सणासाठी एसटी महामंडळाच्या बसेसला दरवर्षी प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या दिवाळी सणासाठी परिवहन महामंडळाच्या विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात चोवीस तास चालू असलेल्या एस.टी. बसेसने दिवाळी सणातील आठ दिवस तब्बल २ लाख कि.मी. अंतर कापले. त्यातून महामंडळाला १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. शहर बससेवा म्हणून सुरू करण्यात आलेली लालपरी दररोज प्रवाशांच्या सेवेत आहे. सध्या शहरात ४४ शहर बस प्रवाशांसाठी सेवा पुरवित आहेत. दररम्यान, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत १ लाख ९३ हजार ५४० फेèया पूर्ण करून २३ लाख ७१ हजार ३९७ कि.मी. कापले. सकाळी व दुपारी अशा दोन्ही वेळेत शहर बससेवा प्रवाशांसाठी सेवा पुरवित असल्याने त्यातून ४ कोटी ७७ लाख ४२ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र दिेवसेंदिवस खासगी वाहतूक वाढत चालली असून सहा आसनी रिक्षा बरोबरच खासगी बसेसमुळे शहर बसच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. याशिवाय शहरातील अनेक नागरिक दिवाळी सणासाठी बाहेरगावी गेल्याने त्याचाही फटका बसला. यामुळे प्रति दिवस २० हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याअखेर ३१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद : दिवाळी सणात एसटी महामंडळाची चांदी झाली असली तरी शहर बससेवेचं मात्र दिवाळं निघालं. या दिवाळीत जिल्ह्यात २ लाख कि.मी. अंतर एस.टी. बसेसने कापून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. परंतु सिटी बसेसला प्रति दिन वीस हजारांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात दसरा-दिवाळी सणासाठी एसटी महामंडळाच्या बसेसला दरवर्षी प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या दिवाळी सणासाठी परिवहन महामंडळाच्या विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात चोवीस तास चालू असलेल्या एस.टी. बसेसने दिवाळी सणातील आठ दिवस तब्बल २ लाख कि.मी. अंतर कापले. त्यातून महामंडळाला १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. शहर बससेवा म्हणून सुरू करण्यात आलेली लालपरी दररोज प्रवाशांच्या सेवेत आहे. सध्या शहरात ४४ शहर बस प्रवाशांसाठी सेवा पुरवित आहेत. दररम्यान, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत १ लाख ९३ हजार ५४० फेèया पूर्ण करून २३ लाख ७१ हजार ३९७ कि.मी. कापले. सकाळी व दुपारी अशा दोन्ही वेळेत शहर बससेवा प्रवाशांसाठी सेवा पुरवित असल्याने त्यातून ४ कोटी ७७ लाख ४२ हजार ४१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र दिेवसेंदिवस खासगी वाहतूक वाढत चालली असून सहा आसनी रिक्षा बरोबरच खासगी बसेसमुळे शहर बसच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. याशिवाय शहरातील अनेक नागरिक दिवाळी सणासाठी बाहेरगावी गेल्याने त्याचाही फटका बसला. यामुळे प्रति दिवस २० हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याअखेर ३१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.