अपघातात कारचा चेंदामेंदा
प्रतिनिधी
औरंगाबाद : नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव पाठीमागून कार धडकून झालेल्या अपघातात तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नागपुर - मुंबई हायवेवरील लासुर स्टेशन नजिक असलेल्या टोल नाक्याजवळ घडली. जळगाव जामोद येथील प्रकाश करणqसग राजपूत, सागर श्रीकृष्ण असबे, निखील अनिल पाटील आणि चालक संतोष रामqसग सोळुंके हे सोमवारी सकाळी मुंबईला जाण्यासाठी कार (एम.एच. २८ व्ही. ३५३१) ने निघाले होते. नागपूर - मुंबई राज्य महामार्गावरील भानवाडी शिवारातील टोलनाक्या समोरून टोल न चुकविता भरधाव वेगात जात असताना कारचालक संतोष सोळुंकेचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या नादुरुस्त ट्रक (एम.एच. २० ए.टी. ७८५) च्या पाठी मागून धडक दिली आणि पुन्हा कार पुढे गेली व टोलनाक्यावरील बोर्डाच्या लोंखडी खांबावर आदळून पुन्हा उलट दिशेने रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघाताची माहिती मिळताच लासूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश सोनवणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात प्रकाश करणqसग राजपुत, सागर श्रीकृष्ण असबे हे दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अती रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमी निखील अनिल पाटील आणि चालक संतोष सोळुंके या दोघांना रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्या दोघांवर उपचार सुरु असताना चालक संतोष सोळुंके याची प्राणज्योत मालवली. निखील पाटीलच्या प्रकृतीत सुधारणा
होत असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले. या प्रकरणी लासूर स्टेशन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश सोनवणे करत आहेत.
प्रतिनिधी
औरंगाबाद : नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव पाठीमागून कार धडकून झालेल्या अपघातात तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नागपुर - मुंबई हायवेवरील लासुर स्टेशन नजिक असलेल्या टोल नाक्याजवळ घडली. जळगाव जामोद येथील प्रकाश करणqसग राजपूत, सागर श्रीकृष्ण असबे, निखील अनिल पाटील आणि चालक संतोष रामqसग सोळुंके हे सोमवारी सकाळी मुंबईला जाण्यासाठी कार (एम.एच. २८ व्ही. ३५३१) ने निघाले होते. नागपूर - मुंबई राज्य महामार्गावरील भानवाडी शिवारातील टोलनाक्या समोरून टोल न चुकविता भरधाव वेगात जात असताना कारचालक संतोष सोळुंकेचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या नादुरुस्त ट्रक (एम.एच. २० ए.टी. ७८५) च्या पाठी मागून धडक दिली आणि पुन्हा कार पुढे गेली व टोलनाक्यावरील बोर्डाच्या लोंखडी खांबावर आदळून पुन्हा उलट दिशेने रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघाताची माहिती मिळताच लासूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश सोनवणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात प्रकाश करणqसग राजपुत, सागर श्रीकृष्ण असबे हे दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अती रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमी निखील अनिल पाटील आणि चालक संतोष सोळुंके या दोघांना रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्या दोघांवर उपचार सुरु असताना चालक संतोष सोळुंके याची प्राणज्योत मालवली. निखील पाटीलच्या प्रकृतीत सुधारणा
होत असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले. या प्रकरणी लासूर स्टेशन पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश सोनवणे करत आहेत.