प्रतिनिधी
औरंगाबाद : बाळासाहेबांचे कार्यक्षेत्र औरंगाबाद व जालना जिल्हा असले तरी ते खèया अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते होते. शेतकèयांना व कष्टकरी वर्गांना सहकारी तत्वाच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात साखर कारखान्याचे जाळे निर्माण करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन डॉ. संजय साळुंके यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने कै. पवार यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी डॉ. साळुंके बोलत होते. अध्यक्षस्थानी वित्त व लेखाधिकारी डॉ.एस.टी. सांगळे होते. केंद्राचे संचालक डॉ.व्ही.बी. भिसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. साळुंके पुढे यांनी आपल्या भाषणात सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षणांचे महत्त्व ओळखून शिक्षणाचा प्रसार तळागळातल्या वर्गापर्यंत करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. जनतेच्या कल्याणाच्या कामात ते हिरीरीने भाग घेत. बाळासाहेबांचे जीवन हे जसे खासगी स्वरुपाचे होते तसे ते सार्वजनिक स्वरुपाचे होते. योजना व कल्पकतेच्या सानिध्यातून त्यांनी मराठवाड्याचा विकास करण्याची दिशा ठरवली. कुठल्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसतानाही हे असामन्य व्यक्तिमत्व मराठवाड्याच्या राजकारणात अग्रेसर ठरले, असे डॉ.साळुंके म्हणाले. यावेळी डॉ.सांगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाळासाहेबांच्या खèया अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषविण्याची क्षमता असतानाही हा लोकनेता आपल्या स्वभावामुळे त्यापासून कोसो दूर राहिले. बाळासाहेब पवार जीवनाचा अखेरपर्यंत ते सन्मानाने जीवन जगले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हनुमंत भोसले तर आभार नागनाथ शेटकर यांनी मानले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने कै. पवार यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी डॉ. साळुंके बोलत होते. अध्यक्षस्थानी वित्त व लेखाधिकारी डॉ.एस.टी. सांगळे होते. केंद्राचे संचालक डॉ.व्ही.बी. भिसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. साळुंके पुढे यांनी आपल्या भाषणात सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षणांचे महत्त्व ओळखून शिक्षणाचा प्रसार तळागळातल्या वर्गापर्यंत करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. जनतेच्या कल्याणाच्या कामात ते हिरीरीने भाग घेत. बाळासाहेबांचे जीवन हे जसे खासगी स्वरुपाचे होते तसे ते सार्वजनिक स्वरुपाचे होते. योजना व कल्पकतेच्या सानिध्यातून त्यांनी मराठवाड्याचा विकास करण्याची दिशा ठरवली. कुठल्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसतानाही हे असामन्य व्यक्तिमत्व मराठवाड्याच्या राजकारणात अग्रेसर ठरले, असे डॉ.साळुंके म्हणाले. यावेळी डॉ.सांगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाळासाहेबांच्या खèया अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषविण्याची क्षमता असतानाही हा लोकनेता आपल्या स्वभावामुळे त्यापासून कोसो दूर राहिले. बाळासाहेब पवार जीवनाचा अखेरपर्यंत ते सन्मानाने जीवन जगले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हनुमंत भोसले तर आभार नागनाथ शेटकर यांनी मानले.