प्रतिनिधी
कन्नड : माकडाच्या भीतीने जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील जैतापूर शिवारात घडली. संजीवनी ऊर्फ सोनाली विष्णू आव्हाळे (२२) असे या मृत विवाहितेचे नाव आहे.
हतनूर येथील रहिवासी विष्णू आव्हाळे नाशिक जिल्ह्यातील शाळेत शिक्षक आहेत. सध्या सुट्यांमुळे गावी आले होते. सुट्या संपल्याने ते पत्नी संजीवनी ऊर्फ सोनालीसह दुचाकीने नोकरीच्या गावी निघाले. त्याच वेळी त्याच्या शेतातील ऊस मोडण्यासाठी त्यांनी दुचाकी थांबविली. तितक्यात दुचाकीजवळ उभ्या असलेल्या संजीवनी आव्हाळे यांच्याकडे माकडाने अचानक झेप घेतल्याने जवळच असलेल्या त्यांच्याच विहिरीत त्या तोल जाऊन पडल्या. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर शेजाèयांना ही दुर्घटना समजली. राजेंद्र परांडे, रवींद्र अकोलकर, जैतापूरचे पोलिस पाटील शिवाजी केवट, दीपक झाल्टे यांनी तात्काळ त्या महिलेस विहिरीतून वर काढून हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले; मात्र उपचारापूर्वीच संजीवन यांचा मृत्यू झाला. यासंबंधीची खबर पांडुरंग नाना अकोलकर यांनी देवगाव रंगारी पोलिस ठाण्याला दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
कन्नड : माकडाच्या भीतीने जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील जैतापूर शिवारात घडली. संजीवनी ऊर्फ सोनाली विष्णू आव्हाळे (२२) असे या मृत विवाहितेचे नाव आहे.
हतनूर येथील रहिवासी विष्णू आव्हाळे नाशिक जिल्ह्यातील शाळेत शिक्षक आहेत. सध्या सुट्यांमुळे गावी आले होते. सुट्या संपल्याने ते पत्नी संजीवनी ऊर्फ सोनालीसह दुचाकीने नोकरीच्या गावी निघाले. त्याच वेळी त्याच्या शेतातील ऊस मोडण्यासाठी त्यांनी दुचाकी थांबविली. तितक्यात दुचाकीजवळ उभ्या असलेल्या संजीवनी आव्हाळे यांच्याकडे माकडाने अचानक झेप घेतल्याने जवळच असलेल्या त्यांच्याच विहिरीत त्या तोल जाऊन पडल्या. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर शेजाèयांना ही दुर्घटना समजली. राजेंद्र परांडे, रवींद्र अकोलकर, जैतापूरचे पोलिस पाटील शिवाजी केवट, दीपक झाल्टे यांनी तात्काळ त्या महिलेस विहिरीतून वर काढून हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले; मात्र उपचारापूर्वीच संजीवन यांचा मृत्यू झाला. यासंबंधीची खबर पांडुरंग नाना अकोलकर यांनी देवगाव रंगारी पोलिस ठाण्याला दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.