प्रतिनिधी
औरंगाबाद : बराच वेळ पैसे येईनात म्हणून निघून गेलेल्या ग्राहकाचे पैसे त्यानंतर आलेल्या ग्राहकाला दिसले. पण त्यांनी ते स्वतःकडे ठेवून न घेता बँकेकडे परत करून प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले.
सहायक गुप्तवार्ता अधिकारी वसंत शेजूळ उस्मानपुरा येथील ठाणे जनता बँकेच्या एटीएमवर गेले. तेथे कार्ड स्वॅप करण्याआधीच ५०० आणि १०० च्या नोटा बाहेर आलेल्या त्यांना दिसल्या. पैसे काढण्यासाठी गेलेली व्यक्ती मशीनमधून तात्काळ पैसे न आल्याने निघून गेली असावी. एटीएम सेंटरवर त्यावेळी कोणीही नव्हते. शेजूळ यांनी पैसे मोजले असता त्यात दहा हजार रुपये होते. शेजूळ यांनी ठाणे जनता बँकेत व्यवस्थापक श्याम अनिखंडी यांना भेटून ही रक्कम ज्या ग्राहकाची असेल त्याला बोलवा, अशी विनंती केली. तेव्हा एटीएममधून त्यावेळ कोणी पैसे काढले हे आताच सांगणे कठीण आहे. मुंबई येथील कार्यालयाकडून याविषयी आम्हाला निरोप येईल. त्यानंतर संबंधिताला ही रक्कम परत करता येईल, असे अनिखंडी यांनी सांगितले. त्यांनी शेजूळ यांच्याकडून ही रक्कम चलनाद्वारे बँकेत जमा करून घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.
औरंगाबाद : बराच वेळ पैसे येईनात म्हणून निघून गेलेल्या ग्राहकाचे पैसे त्यानंतर आलेल्या ग्राहकाला दिसले. पण त्यांनी ते स्वतःकडे ठेवून न घेता बँकेकडे परत करून प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले.
सहायक गुप्तवार्ता अधिकारी वसंत शेजूळ उस्मानपुरा येथील ठाणे जनता बँकेच्या एटीएमवर गेले. तेथे कार्ड स्वॅप करण्याआधीच ५०० आणि १०० च्या नोटा बाहेर आलेल्या त्यांना दिसल्या. पैसे काढण्यासाठी गेलेली व्यक्ती मशीनमधून तात्काळ पैसे न आल्याने निघून गेली असावी. एटीएम सेंटरवर त्यावेळी कोणीही नव्हते. शेजूळ यांनी पैसे मोजले असता त्यात दहा हजार रुपये होते. शेजूळ यांनी ठाणे जनता बँकेत व्यवस्थापक श्याम अनिखंडी यांना भेटून ही रक्कम ज्या ग्राहकाची असेल त्याला बोलवा, अशी विनंती केली. तेव्हा एटीएममधून त्यावेळ कोणी पैसे काढले हे आताच सांगणे कठीण आहे. मुंबई येथील कार्यालयाकडून याविषयी आम्हाला निरोप येईल. त्यानंतर संबंधिताला ही रक्कम परत करता येईल, असे अनिखंडी यांनी सांगितले. त्यांनी शेजूळ यांच्याकडून ही रक्कम चलनाद्वारे बँकेत जमा करून घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.