दिराशी भांडण झाले म्हणून जीव द्यायला आली होती रेल्वेरूळावर
प्रतिनिधी
औरंगाबाद : तान्ह्या मुलीसह आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आलेल्या महिलेला नागरिक आणि पोलिसांनी वाचविले. घरी दिराशी झालेल्या किरकोळ कुरबुरीनंतर तिने हे अविचारी टोकाचे पाऊल उचलले होते. उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अनिता दीपक गायकवाड (२५, रा. इंदिरानगर, गारखेडा) हिचे दिराशी भांडण झाले. रागाच्या भरात अनिता चार महिन्यांची मुलगी लक्ष्मी हिला घेऊन रेल्वे रुळांवर चालत छोटा मुरलीधरनगर येथे पोहचली. नंतर ती रुळाच्या मध्यभागी उभी राहिली. ही वेळ रेल्वे येण्याची होती. काही नागरिकांनी तिला बघितले. त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याला फोनवर याची माहिती दिली. ठाणे अंमलदार एल.एस. पगारे यांनी तात्काळ बीट मार्शल शेख यांना घटनास्थळी पाठवले. शेख यांनी नागरिकांच्या मदतीने तिला पोलिस ठाण्यात आणले. तिची समजूत काढत नाव व पत्ता घेतला व तिला जवाहरनगर पोलिस ठाण्यात आणले व समजूत घातली. तिची सासू जनाबाई पुंडलिक गायकवाड आणि मामा लक्ष्मण जाधव यांना ठाण्यात बोलावून घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले.
प्रतिनिधी
औरंगाबाद : तान्ह्या मुलीसह आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आलेल्या महिलेला नागरिक आणि पोलिसांनी वाचविले. घरी दिराशी झालेल्या किरकोळ कुरबुरीनंतर तिने हे अविचारी टोकाचे पाऊल उचलले होते. उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अनिता दीपक गायकवाड (२५, रा. इंदिरानगर, गारखेडा) हिचे दिराशी भांडण झाले. रागाच्या भरात अनिता चार महिन्यांची मुलगी लक्ष्मी हिला घेऊन रेल्वे रुळांवर चालत छोटा मुरलीधरनगर येथे पोहचली. नंतर ती रुळाच्या मध्यभागी उभी राहिली. ही वेळ रेल्वे येण्याची होती. काही नागरिकांनी तिला बघितले. त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याला फोनवर याची माहिती दिली. ठाणे अंमलदार एल.एस. पगारे यांनी तात्काळ बीट मार्शल शेख यांना घटनास्थळी पाठवले. शेख यांनी नागरिकांच्या मदतीने तिला पोलिस ठाण्यात आणले. तिची समजूत काढत नाव व पत्ता घेतला व तिला जवाहरनगर पोलिस ठाण्यात आणले व समजूत घातली. तिची सासू जनाबाई पुंडलिक गायकवाड आणि मामा लक्ष्मण जाधव यांना ठाण्यात बोलावून घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले.