प्रतिनिधी
औरंगाबाद : आज सकाळी नऊ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून मराठवाड्यासाठी ताशी साडेसात हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. या धरणातून तीन टीमएमसी पाणी सोडण्यात येणार असून ते औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात चोवीस तासानंतर पोहोचेल असा अंदाज आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण यंदा रिकामे आहे. त्यामुळे औरंगाबादसह अनेक शहरांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतींसमोरही संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा एक भाग म्हणून आज सकाळी मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले. लवकरच नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून तीन टीएमसी आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा ते जायकवाडी हे सुारे ५४ कि. मी. चे अंतर असून या भागातील नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून पाणी जायकवाडीत पोहोचल्यानंतर तो पूर्ववत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर या भागातील नदी पात्रातील कोल्हापुरी बांधाèयांच्या लोखंडी फळ्या काढून घेण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता मुळा ते जायकवाडी हे अंतर पार करण्यास पाण्याला चोवीस तास पुरेसे आहेत; तथापि वाळूचा बेसुार उपसा झाल्यामुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर नदीपात्र कोरडे असल्यामुळे पाणी अपेक्षित वेगाने पोहचणार नाही. त्यामुळे सोडलेल्या पाण्यापैकी प्रत्यक्षात किती पाणी जायकवाडी धरणात पोहचते हा प्रश्न आहेच.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण यंदा रिकामे आहे. त्यामुळे औरंगाबादसह अनेक शहरांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतींसमोरही संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा एक भाग म्हणून आज सकाळी मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले. लवकरच नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून तीन टीएमसी आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा ते जायकवाडी हे सुारे ५४ कि. मी. चे अंतर असून या भागातील नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून पाणी जायकवाडीत पोहोचल्यानंतर तो पूर्ववत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर या भागातील नदी पात्रातील कोल्हापुरी बांधाèयांच्या लोखंडी फळ्या काढून घेण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता मुळा ते जायकवाडी हे अंतर पार करण्यास पाण्याला चोवीस तास पुरेसे आहेत; तथापि वाळूचा बेसुार उपसा झाल्यामुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर नदीपात्र कोरडे असल्यामुळे पाणी अपेक्षित वेगाने पोहचणार नाही. त्यामुळे सोडलेल्या पाण्यापैकी प्रत्यक्षात किती पाणी जायकवाडी धरणात पोहचते हा प्रश्न आहेच.