औरंगाबाद : प्रवासी मिळवण्याच्या नादात अॅपेरिक्षा चालक बेभानपणे वाहन चालवतात. यामुळे अनेकदा अपघातही घडतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा असताना, अनेकदा केवळ प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिस त्यांना सोडून देतात. महानुभाव पोलिस चौकीसमोर मात्र वेगळाच प्रकार समोर आला. मोपेडला उडवणारा अॅपे पोलिसांनी थांबवून ठेवूनही आणि या अपघाताला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतानाही पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले. विशेष म्हणजे आरोपींनी चौकीतच प्रत्यक्षदर्शीला धमकावणे सुरू केले होते आणि पोलिस हतबलपणे सर्व प्रकार पाहत होते.
शिरीष शरदचंद्र शेलार (३८, रा. विटखेडा) यांचा पैठण रोडवर एक भूखंड आहे. काल सकाळी ते भूखंडावर बसलेले होते. त्यावेळी एका अॅपेरिक्षाच्या धडकेने मोपेडस्वार महिला आणि मुलगी जखमी झाली. ही घटना शिरीष यांनी पाहिली व माहिती महानुभाव चौकी पोलिसांना दिली. नंतर जखमींना दवाखान्यात नेले. पोलिसांनी अॅपे अडवून ठेवली. अॅपेरिक्षाचालकाने याबाबतची माहिती आपल्या मालकास दिली. रिक्षामालकाने शेख हकीम शेख कडू पटेल (३६) आणि शेख नदीम शेख गफूर (३८, दोघेही रा. देवळाई) यांना पोलिस चौकीत पाठविले. त्यावेळी शिरीष यांनी पोलिसांना सांगितले की, याच अॅपेने हा अपघात केला आहे. तर रिक्षाचालकाचे म्हणणे होते की, मोपेडला कारचा धक्का लागला होता. त्यावेळी हकीम आणि नदीम यांनी रिक्षाचालकाची बाजू घेत असल्याने शिरीषसोबत त्यांच्यात भांडण झाले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही पक्षाने आपल्या समर्थकांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांसमोर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिस जमादार वाघ यांनी सांगितले. या प्रकरणातील पोलिसांची मिळमिळीत भूमिका नक्कीच सामान्यांना बरेच काही शिकवून गेली आहे आणि यानंतर तरी कुणी असे कुणाच्या मदतीला जाणार नाही, एवढे नक्की!
शिरीष शरदचंद्र शेलार (३८, रा. विटखेडा) यांचा पैठण रोडवर एक भूखंड आहे. काल सकाळी ते भूखंडावर बसलेले होते. त्यावेळी एका अॅपेरिक्षाच्या धडकेने मोपेडस्वार महिला आणि मुलगी जखमी झाली. ही घटना शिरीष यांनी पाहिली व माहिती महानुभाव चौकी पोलिसांना दिली. नंतर जखमींना दवाखान्यात नेले. पोलिसांनी अॅपे अडवून ठेवली. अॅपेरिक्षाचालकाने याबाबतची माहिती आपल्या मालकास दिली. रिक्षामालकाने शेख हकीम शेख कडू पटेल (३६) आणि शेख नदीम शेख गफूर (३८, दोघेही रा. देवळाई) यांना पोलिस चौकीत पाठविले. त्यावेळी शिरीष यांनी पोलिसांना सांगितले की, याच अॅपेने हा अपघात केला आहे. तर रिक्षाचालकाचे म्हणणे होते की, मोपेडला कारचा धक्का लागला होता. त्यावेळी हकीम आणि नदीम यांनी रिक्षाचालकाची बाजू घेत असल्याने शिरीषसोबत त्यांच्यात भांडण झाले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्ही पक्षाने आपल्या समर्थकांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांसमोर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिस जमादार वाघ यांनी सांगितले. या प्रकरणातील पोलिसांची मिळमिळीत भूमिका नक्कीच सामान्यांना बरेच काही शिकवून गेली आहे आणि यानंतर तरी कुणी असे कुणाच्या मदतीला जाणार नाही, एवढे नक्की!