देव तारक तारक । देव दुष्टांसी मारक
॥१॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो
भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं
रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन
अंतरीं ॥४॥
वारीकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जाणण्यासाठी एकटया जनाबाईच्या जीवनचरित्राचा अभ्यास पुरेसा आहे.समाजातील अत्यंत अस्पृश समाजात जन्मलेली शेण गोवर्या गोळा करणारी,लोकांच्या घरी घरकाम करणारी जनाबाईने आपल्यातील असामान्य प्रतिभेमुळे वारकरी संप्रदायामध्ये मानाचे स्थान प्राप्त केले.
प्रस्तृत अभंगामधून संत जनाबाई सांगतात की, देव हा सर्वशक्तीसंपन्न असून हया संपूर्ण विश्वाचा नियंत्रक आहे. देव हा तारक अर्थात सर्वाचे पालन, पोषन करणारा आहे.देवाचे तारक हे रूप करूणा ,प्रेम, मार्गदर्शन करणारे आहे. देव आपल्या चूकांना विवेकरूपी दिपाने दाखवून आपल्याला वाईट मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गावर आणतो.आपल्यातील घृणेचे प्रेमात रूपांतर करतो.
धरलासी अवतार दुष्टा माराया।साधू संतजन पृथ्वी ताराया।।
देव
दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेवून खरा अर्थाने सज्जन ,सात्वीक
लोकांचे रक्षण करतो.देवाचे अवतार कार्य हे दुष्टांचा नाश व साधूचे रक्षण
हेच आहे.भक्ताच्या रक्षणार्थ देव हा सदैव तत्पर असतो. जनाबाई प्रस्तुत
अभंगामधून मनुष्याला सांगतात की, देवाच्या असिम करूणेचा निरंतर आपल्या
वर्षाव होण्यासाठी देवाचे भाव भक्तीने त्यांचे चिंतन
करा.
संतोषबापू थोरहाते,
विवेकानंद नगर मो.
९९२३२०९६५८