भक्ति सुखामध्ये ,मन ते रमले। तेणे विसरले,विषयासी।।
देवापायी वेडे ,झाले माझे मन। गेले देहभान ,हारपून।।
भक्ति प्रेमापूढे ,सर्व तुच्छ वाटे। देवावीन कोठे,करमेना।।
शुकदास म्हणे,सुखाचा सुकाळ । जाय तळमळ,भक्तिमूळे।।
देवापायी वेडे ,झाले माझे मन। गेले देहभान ,हारपून।।
भक्ति प्रेमापूढे ,सर्व तुच्छ वाटे। देवावीन कोठे,करमेना।।
शुकदास म्हणे,सुखाचा सुकाळ । जाय तळमळ,भक्तिमूळे।।
- प. पू. शुकदास महाराजश्री, संस्थापक अध्यक्ष, विवेकानंद आश्रम
मानवी जीवनात भक्तिचे अनन्य साधारण असे महत्व आहे. भक्त आणि ईश्वर यांच्यामधील सेतू म्हणजे भक्ति होय संपूर्ण जीवन मनुष्य सुखाचा पाठलाग करतो,किंबहुना सुख हे प्रत्येक व्यक्तीचे अंतिम ध्येय असते .शाश्वत सुखाची अपेक्षा प्रत्येक जीव करत असतो. मात्र सुख आणि दुःख यांचा ऊन सावलीचा खेळ अविरत सुरू असतो.भक्तिमध्ये मिळणारे सुख हे खर्या अर्थाने शाश्वत सुख असते. एकदा का भक्त हया शाश्वत सुखा मध्ये रममान झाला की त्याला आपल्या देहाचे सुध्दा भान राहत नाही. मी आणि ईश्वर हे एक आहे असा अदैव्दभाव जागृत होतो. त्यामुळे साहजिकच सांसारिक विषय वासना यापासून तो परावृत्त होत जातो.त्याच्या डोळयासमोर ईश्वर असल्यामुळे त्यांची संपूर्ण भय,चिंता क्लेश दूर होतात. अशा अवस्थेत भक्ताला अदैव्ताची अनुभूती होते. भक्ताला भक्तीरसाची ओढ लागली की ,सांसारिक तुच्छ इच्छा,व्देश,क्रोध ,लोभ नष्टप्राय होवून जातात. मनुष्याने पुष्कळ तप, जप, योग, शास्त्राध्यन ,दान केले तरी जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये भक्ती नसेल तर सर्व व्यर्थ आहे.
-संतोषबापू थोरहाते
विवेकानंद नगर
मो.9923209658
विवेकानंद नगर
मो.9923209658