जे का रंजलें गांजलें, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा
मृदू सबाह्य नवनीत, तैसें सज्जनाचें चित्त
ज्यासि अपंगिता नाहीं, त्यासि धरी जो हृदयी
दया करणे जें पुत्रासी, ते चि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंती मूर्ती
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा
मृदू सबाह्य नवनीत, तैसें सज्जनाचें चित्त
ज्यासि अपंगिता नाहीं, त्यासि धरी जो हृदयी
दया करणे जें पुत्रासी, ते चि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंती मूर्ती
- संत तुकाराम महाराज
जी माणसं गरीब असतात. दीन- दुबळी, रंजलेली- गांजलेली, अपंग असतात. अशा माणसांना जो आपलं म्हणतो. तोच माणूस साधू असतो आणि आपण देवही अशाच माणसामध्ये पहायचा असतो. लोणी जसं आतून आणि बाहेरूनही मऊ असतं. तसं चांगल्या माणसाचं मन आतून आणि बाहेरूनही चांगलंच असतं. ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही, अशा लोकांना जो आपल्या हृदयाजवळ धरतो, अशांची जो सेवा करतो तोच साधू असतो. स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम असतं, तेवढंच प्रेम जो आपल्या नोकरावरही आणि इतरांवरही करतो तोच साधू असतो. म्हणून लोकांनी मी तुम्हाला किती सांगू अरे अशीच माणसं म्हणजे साक्षात भगवंताचीच मूर्ती असतात.तात्पर्य : देवाचा शोध मंदिरात घेण्याऐवजी चांगल्या माणसात घ्यावा.
- विजय गवळी