ऑक्टोबरमध्येच थंडीचा पारा वाढला
प्रतिनिधी
प्रतिनिधी
औरंगाबाद : यावर्षी पाऊस झाला नसल्यामुळे थंडी पडली की नाही अशी शंका शेतकèयांसह अनेकांच्या मनात होती. मात्रदिवाळी सरत नाही तोवरच थंडीने उग्र रुप धारण केले असून सायंकाळी सहा वाजल्यापासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. ही थंडी काहींना त्रासदायक ठरत असली तरी पिकांसाठी संजीवनी ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
यावर्षी मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने आपली दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प पावसाळा संपताच कोरडेठाक पडलेले आहेत. जमिनीत पाणी नसल्यामुळे थंडी पडणार नाही अशी शक्यता शेतकरी वर्तवत होते. दिवाळी सरत नाही तोच थंडी मोठ्या प्रमाणावर पडत आहे. अनेक भागामध्ये सायंकाळी चार वाजल्यापासूनच थंडी जाणवत आहे. थंडी पडत असल्यामुळे डासांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी डेंग्यूने मराठवाड्यात थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नगर परिषदांच्या वतीने फॉगिंग करण्यात आले होते. थंडीचा कडाका वाढला असल्यामुळे मच्छरांची संख्या झपाट्याने कमी झाले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान थंडी पडत असल्यामुळे अनेक नागरिक उबदार कपडे घेण्याकडे वळत असल्याचे बाजारात दिसून येत आहे. या विषयी बोलताना शहरातील स्वेटर विक्रेते राजेश खंडेलवाल म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून शहरात थंडी वाढली आहे. यामुळे अनेक महिला, पुरुष स्वेटर खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांच्या स्वेटरची मागणी यंदा वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वेटरच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. स्वेटर विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. बालकापासून ते वयोवृध्दापर्यंत स्वेटर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. स्वेटर विक्रेते अशोक खंदारे म्हणाले, युवक व युवतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स उपलब्ध झाले आहेत. याची मागणी वाढत आहे. सकाळी थंडी पडत असल्यामुळे जागोजागी अनेक जण शेकोटी करताना दिसून येत आहे. व्यायाम करण्यासाठी अनेक वयोवृध्द घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या दिवसात व्यायाम मानवत असल्यामुळे अनेक युवक - युवती रस्त्यावर फिरायला आणि जॉगिंग करायला बाहेर पडल्याचे चित्र पहाटे पहावयास मिळत आहे. थंडी वाढली असल्यामुळे बाजारात उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने आपली दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प पावसाळा संपताच कोरडेठाक पडलेले आहेत. जमिनीत पाणी नसल्यामुळे थंडी पडणार नाही अशी शक्यता शेतकरी वर्तवत होते. दिवाळी सरत नाही तोच थंडी मोठ्या प्रमाणावर पडत आहे. अनेक भागामध्ये सायंकाळी चार वाजल्यापासूनच थंडी जाणवत आहे. थंडी पडत असल्यामुळे डासांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी डेंग्यूने मराठवाड्यात थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नगर परिषदांच्या वतीने फॉगिंग करण्यात आले होते. थंडीचा कडाका वाढला असल्यामुळे मच्छरांची संख्या झपाट्याने कमी झाले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान थंडी पडत असल्यामुळे अनेक नागरिक उबदार कपडे घेण्याकडे वळत असल्याचे बाजारात दिसून येत आहे. या विषयी बोलताना शहरातील स्वेटर विक्रेते राजेश खंडेलवाल म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून शहरात थंडी वाढली आहे. यामुळे अनेक महिला, पुरुष स्वेटर खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांच्या स्वेटरची मागणी यंदा वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वेटरच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. स्वेटर विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. बालकापासून ते वयोवृध्दापर्यंत स्वेटर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. स्वेटर विक्रेते अशोक खंदारे म्हणाले, युवक व युवतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स उपलब्ध झाले आहेत. याची मागणी वाढत आहे. सकाळी थंडी पडत असल्यामुळे जागोजागी अनेक जण शेकोटी करताना दिसून येत आहे. व्यायाम करण्यासाठी अनेक वयोवृध्द घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या दिवसात व्यायाम मानवत असल्यामुळे अनेक युवक - युवती रस्त्यावर फिरायला आणि जॉगिंग करायला बाहेर पडल्याचे चित्र पहाटे पहावयास मिळत आहे. थंडी वाढली असल्यामुळे बाजारात उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे.