Home » » तिहेरी अपघातात एक ठार, तीन जण गंभीर जखमी

तिहेरी अपघातात एक ठार, तीन जण गंभीर जखमी

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२ | ७:११ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद : भरधाव इंडिका कार, टाटा सुमो आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबादजळगाव महामार्गावरील बोरगाव फाट्यावर घडली. जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरी मगन सोनवणे (४०) रा. खामगाव, ता. फुलंब्री, असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबादकडून जळगावकडे भरधाव जाणाèया एका टाटा सुमोने बोरगाव फाट्यावर समोरून येणाèया ट्रॅक्टरला धडक दिली. याचवेळी बुलडाण्याकडे जाणाèया एका इंडिका कारनेही ट्रॅक्टरला धडक दिली. या तिहेरी अपघातात ट्रॅक्टरवरील हरी मगन सोनवणे (४०), इंडिका कारमधील सुशील रमेश पाटील (२५), रमेश मंगलमूर्ती पाटील (५०) आणि विलास भरत जाधव (३५) सर्व रा. बुलडाणा हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना तत्काळ औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. तथापि जखमींपैकी हरी सोनवणे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अन्य तीन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.