औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या कैलासनगर (वार्ड क्र.५८) येथील चौकास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर कैलासनगर परिसरातील चौकास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन आदरांजली वाहिली. याच रस्त्याला यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नावही देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कैलासनगर हा भाग नेहमी शिवसेनेच्यासोबत राहिला आहे. या वार्डामध्ये नेहमी युतीचीच सत्ता राहिली आहे. या वार्डात नगरसेवक म्हणून शिवसेनेचेच आग खान निवडून आलेले आहेत. त्यांच्याच पुढाकाराने चौकाचे नामकरण करण्यात आले. चौकाचे नामकरण करताना नगरसेवक आगा खान, युसूफ खान, अनिकेत राठोड, गणेश अम्बिलवादे, नरेश भालेराव, राजू वाडेकर, सुधीर जाधव, भगवान उदावंत राजू मिसाळ, जितू वाघ, राजू qशदे, योगेश रणधीर, संदीप बोर्डे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.