Home » » रबी पेरणीला शेतकरी धजावेनात

रबी पेरणीला शेतकरी धजावेनात

Written By Aurangabadlive on बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२ | ११:२३ AM

औरंगाबाद : पावसाळा संपला तरी अल्प पावसाने नदी-नाले, तलावात जलसाठा उपलब्ध नाही. आतापर्यंत नावालाच ६९ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे रबी पेरणी करण्यास शेतकरी तितकासा धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गव्हाकडे पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे.
पावसाळा जून महिन्यात सुरू होतो. परंतु या महिन्यात ९ वेळा पावसाने हजेरी लावली आणि  जूनची कसर जुलै महिन्यात निघेल ही अपेक्षा फोल ठरली. जुलै महिन्यात २० वेळा पावसाने हजेरी लावूनही १७० मि.मी.ची नोंद झाली. खरीप हंगामात पिकापुरता पाऊस पडत राहिला. परंतु जमिनीची तहान भागत नव्हती. तरीही शेतकèयांनी ऑगस्ट महिन्यावर लक्ष केंद्रीत केले. परंतु ऑगस्टमध्ये २३ वेळा पावसाची नोंद झाला. ऑक्टोबर महिन्यातील पावसावर रबी हंगामाची मदार राहील, असे शेतकèयांना वाटले. गहू लागवड करण्यास शेतकरी पाण्याअभावी धजावत नसल्याचे चित्र आहे. अल्प पावसामुळे हरभरा लागवडीकडे शेतकèयांचा कल आहे. त्यात थंडीचा गारठा अद्याप म्हणावा तसा नाही.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.